थोडक्यात माहिती
ओम नमो जी आद्या, वेदप्रतीपाद्या ।
जयजय स्वयंवेद्या ।
आत्मरुपा ।।१।।
देवा तूचि श्रीगणेशु ।
सकलार्थ मती प्रकाशु ।
म्हणे निवृत्तीदासू ।
अवधारि जो जी ।। २।।
सर्व जगताचे आद्मकारण, सर्व वेदांचा कर्ता आणि निर्गुण, स्वयंप्रकाशी, आत्मरुपी आणि सकलमतिप्रकाशु मंगलमुर्ती मोरया हे सर्व सृष्टीचे आराध्य दैवत, कोणत्याही शुभ प्रसंगाचा प्रारंभ श्री गजाननाच्या स्मरणानेच केला जातो. विघ्नासूर दैत्याचा संहार करणारे आणि संकटसमयी सा-या विघ्नांचे हरण करणारे हे दैवत आपल्या हृदय मंदिराच्या गाभा-यात सदैव विराजमान असते ते म्हणजे श्रीगणेश….
श्रीक्षेत्र ओझर, तिर्थक्षेत्र
श्री विघ्नेश्वर गणेशाची पौराणिक कथा-
पुरातन काळाची कथा आहे. हेमवती नावाची नगरी होती. तेथे अभिनंदन नावाचा राजा राज्य करीत होता. राजा मोठा महत्वाकांक्षी, सत्ता व संपत्ती याचा लोभी होता. मोहाने माणसाला आपल्या ताकदीचा विसर पडतो. तसे अभिनंदन राजाच्या बाबतीत घडले. एकदा त्याला आपण इंद्रपद मिळवावे असे वाटू लागले. इंद्रपद मिळवायचे म्हणजे यज्ञ करणे जरुरीचे होते. मनात आले आणि सत्तेच्या लोभाने मदांध झालेल्या राजाने इंद्रपद प्राप्तीसाठी यज्ञ सुरु केला. यज्ञात सर्व देवदेवतांसाठी योग्य ती आहुती दिली जाणार होती. परंतु इंद्राचे राज्य घेण्यासाठी यज्ञ असल्याने इंद्रासाठी मात्र तशी आहुती नव्हती. नारदमुनींना हे समजले. ते धावतच इंद्राकडे गेले.
इंद्राची प्रार्थना करुन नारद इंद्राला म्हणाले इंद्रदेवा तुम्हांला पृथ्वीवरची हकीकत कळली का काय म्हणता नारदमुनी मला तर कसलीही गंधवार्ता नाही. इंद्राने उत्तर दिले. तेव्हा नारदमुनिंनी अभिनंदन राजाच्या यज्ञाची व तो इंद्राचा या यज्ञात योग्य तो सन्मान करीत नसल्याची हकीकत वर्णन करुन सांगितली. ती वार्ता ऐकली आणि इंद्र संतापला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. अभिनंदन राजाला काय करु आणि काय नको असे त्याला झाले. इंद्राने काळाचे स्मरण केले. सत्कार्यात, पवित्र गोष्टीत विघ्न आणणे ही काळाला अतिशय आवडणारी गोष्ट. काळाने तात्काळ विघ्नासुराचा अवतार धारण केला. विघ्नासूर पृथ्वी तलावर आला सर्व वैदिक कार्याचा नाश करण्याचा सपाटा त्यांने लावला. सर्व देव भयभीत झाले. तेव्हा सर्व देव श्रीगणेशाला शरण गेले. त्यावेळी श्रीगणेशाचे पराशर ऋषिंच्या आश्रमात वास्तव्य होते. श्री गणेशाने देवांना अभय दिले. आणि पार्श्वपुत्राचे रुप घेतले. आपला मुलगा प्रत्यक्ष श्रीगणेश आहे, हे पार्श्वपुत्र आणि त्यांची पत्नी दीपवत्सला यांना ठाउक नव्हते. तेव्हा आपल्या पुत्राला विघ्नासुराशी लढण्यास पाठवायला ते दोघे तयार नव्हते. शेवटी श्रीगणेशाने त्यांना सगळी हकीकत सांगितली व तो पार्श्वपुत्र विघ्नासुराशी युध्द करण्यास निघाला.
श्रीगणेश व विघ्नासूर यांचे तुंबळ युध्द झाले. काळरुपी विघ्नासुराने अनेक रुपे बदलली, परंतु अखेरीस श्रीगणेशाने त्याला पकडले. विघ्नासूर श्रीगणेशास शरण आला. त्याने अभय मागितले. श्रीगणेशाने त्याला सांगितले ठीक आहे. तुला जिवदान देतो. मात्र जेथे माझे भक्त माझी पूजा-अर्चा, स्मरण करत असतील तेथे तू असता कामा नये. विघ्नासूराने ते कबूल केले. परंतु पुन्हा एक विनंती करीत म्हटले श्रीगणेशा तुझ्या नावाप्रमाणे माझं नांव असावे, अशी इच्छा आहे.
श्रीगणेश म्हणाले तथास्तु. तेव्हा पासून श्रीक्षेत्र ओझरचा श्रीगणेश विघ्नेश्वर, विघ्नहर म्हणून ओळखला जाऊ लागला. भाद्रपद शुध्दचतुर्थीस देवांनी नैऋत्येला विघ्नेश्वराची स्थापना केली. ही घटना श्रीक्षेत्र ओझर याठिकाणी घडली. तो श्रीक्षेत्र ओझरचा विघ्नेश्वर आज संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आहे.
निसर्ग सौंदर्याने नटलेले सात किल्ले :-
१) किल्ले शिवनेरी (जुन्नर)
२) किल्ले नारायणगड (खोडद)
३) किल्ले चावंड (चावंड गाव)
४) किल्ले जीवधन (घाटघर )
५) किल्ले निमगिरी – (निमगिरी गाव)
६) किल्ले हडसर (हडसर गाव)
७) किल्ले सिंदोळा (मढ, पारगाव)
लेणी समुह – सर्वाधिक २६० लेण्या पहावयास मिळतात.
१) अंबा-अंबिका लेणी (खोरे वस्ती जुन्नर)
२) शिवनेरी किल्ला लेणी (जुन्नर)
३) तुळजाभवानी लेणी (पाडळी)
४) लेण्याद्री विनायक लेणी (लेण्याद्री)
५) सुलेमान लेणी (लेण्याद्री)
६) चावंड लेणी (चावंड गाव)
७) हडसर लेणी (हडसर गाव)
८) निमगिरी लेणी (निमगिरी गाव)
९) प्रसिद्ध नाणेघाट लेणी (घाटघर)
प्रसिद्ध मंदिरे
१)अष्टविनायक मंदिरे:-
अ ) गिरीजात्मक लेण्याद्री
ब ) विघ्नहर – ओझर
२) हेमाडपंथी बांधणीतील कोरीव पुरातन मंदिरे :-
अ) नागेश्वर मंदिर खिरेश्वर
ब) कुकडेश्वर मंदिर – कुकडेश्वर
क) अर्ध पीठ काशी ब्रम्हनाथ मंदिर पारूंडे
३) संत समाधी मंदिर :-
अ) संत ज्ञानेश्वर वेद प्रणित रेडा समाधी आळे
ब) संत रंगदास स्वामी समाधी आणे
क) चैतन्य महाराज समाधी- ओतुर
ड) हरिस्वामी संजीवन समाधी नारायणगाव (मिनातीर)

इतर महत्वाची मंदिरे
१) पंचलींग मंदीर जुन्नर
२) उत्तरेश्वर मंदीर – जुन्नर
३) रेणुका माता मंदीर – निमदरी
४) पाताळेश्वर मंदीर जुन्नर
५) खंडोबा मंदीर वडज
६) गुप्त विठोबा प्रति पंढरपूर मंदीर, बांगरवाडी
७) स्वयंभू वरसुबाई माता मंदीर बेलसर
८) दुगदिवी मंदीर दुर्गवाडी हातवीज
९) कपर्दिकेश्वर मंदीर ओतुर
१०) जगदंबा माता मंदीर खोडद
११)निसर्गच्छादित निसर्गमय
हटकेश्वर मंदीर, गोद्रे
प्रसिध्द निसर्ग रम्य घाट
१) पुरातन व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट
घाटघर
२) माळशेज घाट – कल्याण मुंबई महामार्ग
३) दाऱ्याघाट आंबोली
४) लागाचा घाट
५) इंगळून घाट
६) म्हसवंडी घाट
८) हिवरे मिन्हेर घाट
प्रसिद्ध धबधबे
१) आंबोली
२) नाणेघाट
३) माळशेज
४) इंगळूण
५) हातवीज
६) दुर्गादेवी
प्रसिद्ध नद्या
१) मीना नदी व उगमस्थान आंबोली
२) कुकडी नदी व उगमस्थान कुकडेश्वर
३) पुष्पावती नदी व उगमस्थान हरीश्चंद्र गड
४) काळू नदी व उगमस्थान हरीश्चंद्र गड
५) मांडवी नदी व उगमस्थान मांडव
प्रसिद्ध धरणे
१) येडगाव धरण मीना नदी
२) वडज धरण :कुकडी नदी
३) माणिकडोह धरण : कुकडी नदी
५) पिंपळगाव जोगा धरण : पुष्पावती नदी
६) चिल्हेवाडी धरण: मांडवी नदी
